सीमा प्रश्न केव्हाच संपला, आता इथे येऊ नका

 सीमा प्रश्न केव्हाच संपला, आता इथे येऊ नका

मुंबई,दि.5 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमा वादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री आता दररोज चर्चेत येईल असे विधान करताना दिसत आहेत. दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे. तुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. तेथेच लढू. इथे येऊन राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवू नका, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) उद्या बेळगाव येथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोम्मई यांनी हा इशारा दिला आहे.

इशारा दिल्यानंतरही महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना कर्नाटक पोलिसांना देण्यात आल्याची माहिती बोम्मई यांनी दिली. बसवराज बोम्मई यांनी सोमवारी  बंगळुरु येथे माध्यमांशी  बोलताना ही माहिती दिली.

SL/KA/SL
5 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *