सोयाबीन तेलाच्या आयातीत मोठी वाढ

 सोयाबीन तेलाच्या आयातीत मोठी वाढ

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला असला तरीही खाद्यतेलाच्या बाबतीत मात्र अजूनही आपण मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहोत. पामतेलाचे भाव वाढल्याने भारतात पामतेलाची आयात कमी होत आहे. तर सोयातेलाची आयात वाढत आहे. नव्या तेल विपणन वर्षात पहिल्या दोन महिन्यांमध्ये पामतेलाची आयात २४ टक्क्यांनी कमी झाली. तर सोयातेलाची आयात ७३ टक्क्यांनी वाढली. सूर्यफुल तेलाची आयातही ५५ टक्क्यांनी वाढली आहे. सोयातेलाची आयता वाढल्याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

भारताने डिसेंबर महिन्यात ११ लाख ८५ हजार टन खाद्यतेल आयात केली. तर नोव्हेंबर महिन्यात १५ लाख ९० हजार टनांची आयात झाली होती. नोव्हेंबर आण डिसेंबर महिन्यातील एकूण आयात २७ लाख ७५ हजार टन झाली होती. या दोन महिन्यातील आयात गेल्यावर्षीच्या याच काळातील आयातीच्या तुलनेत सव्वातीन लाख टनांनी जास्त आहे.

भारताचे तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. म्हणजेच नवे विपणन वर्ष सुरु होऊन दोन महिने पूर्ण झाले. भारताची खाद्यतेल आयात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात वाढली आहे. डिसेंबरमधील आयात नोव्हेंबरच्या तुलनेत खाद्यतेल आयात काहीशी कमी झाली. मात्र सोयातेल आयात वाढली आहे.

SL/ML/SL

14 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *