‘कोसला’ ही भालचंद्र नेमाडेंची लोकप्रिय कादंबरी आता चित्रपटरूपात

 ‘कोसला’ ही भालचंद्र नेमाडेंची लोकप्रिय कादंबरी आता चित्रपटरूपात

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता चित्रपट येणार आहे. १९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी गेली सहा दशके वाचकांच्या मनावर राज्य करत आहे.

.पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ असे आहे.

आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.

२०१४ मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ५० वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. आता या कादंबरीवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

SL/KA/SL

1 Nov.2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *