पूराच्या संकटातील शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जवसुली नोटीस

 पूराच्या संकटातील शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जवसुली नोटीस

धाराशिव, दि. ३० : अतिवृष्टी आणि स्वतःच्या पावसामुळे शेतीचा मोठा नुकसान झालेलं असताना बँकांकडून वसुली सुरूच आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकरी संकटात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संचितपुर गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना बँकांकडून मिळालेल्या कर्ज वसुलीच्या नोटिसा जुन्या असल्यामुळे, आता कुठेही कर्ज वसुली केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संदर्भात, राज्यातील बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी शेतकऱ्यांकडून कोणतीही वसुली करू नये.

या जुन्या नोटिसांचा मुद्दा काही दिवसांपूर्वी एका जिल्ह्यामध्ये निदर्शनास आला होता. या एका जिल्ह्याच्या घटनेनंतर, अशा प्रकारच्या अनेक जुन्या नोटिसा अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पाऊल उचलले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, अशा जुन्या नोटिसा आमच्या निदर्शनास आल्यानंतर, तात्काळ बँकांशी संपर्क साधून त्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, आता महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याला जुन्या कर्ज वसुलीसाठी त्रास दिला जाणार नाही याची सुनिश्चिती केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बँकांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

SL/ML/SL
30 Sept. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *