बांबू लागवडीचे अपेक्षित ध्येयापेक्षा जास्त लागवड

पालघर दि १७–पालघरच्या उपजिल्हाधिकारी (मनरेगा) विजया जाधव यांनी बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत असे सांगत येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून घेतले जातील. त्यावर तातडीने प्रक्रिया करून पहिल्या वर्षात 80 टक्के रोपं जगवण्याचा आमचा प्रयत्न असेल. रोजगार हमी योजनेतून शेततळ्याच्या योजने साठी आम्ही काही बदल सुचवले आहेत त्यानुसार बदल केल्यास बांबू लागवडीचे स्वतंत्र अनुदान आणि शेततळ्याचे स्वतंत्र अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मिशन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी प्रशासन, श्रमजीवी संघटना, कृषी, ग्रामविकास, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील बांबू मिशन कार्यक्रमाचे पुढील टप्पे 18 आणि 19 मे रोजी डहाणू, तलासरी, मोखाडा, आणि जव्हार तालुक्यामध्ये पार पडणार आहेत.