स्वातंत्र्याची घोषणा करत बलुचिस्तानची भारतात उच्चायुक्तालय उघडण्याची विनंती

 स्वातंत्र्याची घोषणा करत बलुचिस्तानची भारतात उच्चायुक्तालय उघडण्याची विनंती

नवी दिल्ली, दि. १४ : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धस्थिती असताना दुसरीकडे पाकला अंतर्गत संघर्षाने फाळणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकच्या बलुचिस्तान प्रांताने पाकमधुन वेगळे होण्यासाठी वेगवान कारवाई केली आहे. बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना क्वेट्टा सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आता बलोच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करत पाकिस्तानपासून स्वातंत्र झाल्याची घोषणा केली. सोशल मीडियावरही हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

मीर यार बलोच हा एक लेखक आणि स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीचा नेता आहे. त्याने पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र झाल्याचं घोषित केलं. नवी दिल्लीमध्ये बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरू करण्यात यावं अशी मागणी त्याने भारताकडे केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना ही बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या सीमेत धाडावे अशी मागणीही त्याने केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *