जरांगे पाटलांशी चर्चा करून बच्चू कडू मुंबईकडे रवाना
जालना, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या वीस तारखेला आरक्षणासाठी मुंबईत येण्याचा इशारा मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत आमदार बच्चू हे मुख्यमंत्र्यांचे विशेष दूत म्हणून आज मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चेसाठी आले होते. ती करून कडू हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना घेवून मुंबईकडे निघणार आहेत. त्यानुसार या आंदोलनावर तोडगा निघावा याकरिता बच्चू कडू यांनी अंतर वाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान जरांगे पाटलांनी दिलेले सगे सोयरे बाबतचे चार शब्द यावर जरांगे पाटील ठाम आहेत.
त्यात महत्वाचे म्हणजे नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या रक्त नात्यातील सग्या सोयर्याना तातडीनं प्रमाणपत्र द्या,त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनाही याचा लाभ द्या,सग्या सोयऱ्याना लाभ देण्यासाठी कायदा करण्यासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे.यासह 20 तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या,ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी सापडलेल्या लोकांची यादी लावण्यात यावी असं जरांगे पाटलांनी म्हंटले आहे.
यावर आज दोघांत चर्चा करण्यात आली . त्यानंतर बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांचे सर्व शब्द आणि मागणी ही कागदावरती लिहून घेतली. त्यात सगे सोयरे या शब्दाची सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटलांनी केलेली व्याख्या यात दुरुस्ती करण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे.या चर्चेनंतर बच्चू कडू हे मुंबईला निघाले असून याविषयी तोडगा कसा निघेल याकरिता ते आता सरकारशी चर्चा करणार आहेत. यातून काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ML/KA/SL
15 Jan. 2024