लोकसभा निवडणुकीसाठी आयाराम गयाराम ची सुरुवात

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात लोकसभेसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत असतानाच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या मात्र सध्याच्या पक्षात तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्यानी पक्ष त्याग करून अन्यत्र उमेदवारी मिळते का यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे आयाराम गयाराम प्रकाराला राज्यात सुरूवात झाली आहे .
महाराष्ट्रात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महा विकास आघाडी यांचे आपसातील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही तरीही शिवसेना उबाठा ने मुंबईत अमोल किर्तीकर आणि सांगलीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे तर भाजपाने आपल्या वीस उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे,त्यात नितीन गडकरी , पियूष गोयल ,रावसाहेब दानवे , पंकजा मुंडे, सुधीर मुनंटीवार आदींचा समावेश आहे .
अहिल्यानगर अर्थात अहमदनगर इथून भाजपाने सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आ निलेश लंके यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने थेट शरद पवार यांची भेट घेत तुतारी हाती धरली . मात्र त्यांनी रीतसर त्यांच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यांनी असे केल्यास आमदारकीच जाईल असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. दुसरीकडे पुण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने मनसेचा त्याग करून वसंत मोरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आणि उमेदवारीची चाचपणी केली आहे.
एका बाजूला जागा वाटपाची अर्धवट राहिलेली चर्चा आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत सुरू झालेल्या धुसफुसी यांनी शिवसेना शिंदे गट ही सुटलेला नाही, त्यांच्या विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांना लक्ष करीत त्यांच्यावर तिखट टीका करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणले आहे. आज त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत असून त्यातून ते शांत होतात की बंडखोरी करण्याची हिम्मत दाखवतात ते पाहावे लागेल. Ayaram Gayaram’s start for Lok Sabha elections
PGB/ML/PGB
14 March 2024