प्रदूषणानं जलचर तडफडले, पंचगंगा नदी पात्रात मासे मृत्युमुखी

 प्रदूषणानं जलचर तडफडले, पंचगंगा नदी पात्रात मासे मृत्युमुखी

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कसबा बावडा-शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. हजारो मासे ऑक्सीजन साठी तडफडताना दिसत होते.दूषित पाण्यामुळे हे मासे मरत असताना पाणी प्रदूषित कशामुळे झालं, अशी विचारणा नागरिकांतून व्यक्त होत होती. Aquatic life has died due to pollution fish are dying in Panchganga river basin.

गेल्या काही दिवसांपासून राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीपात्राच्या खालील बाजूस पाणी जास्त प्रमाणात प्रवाहित होत नाही. सध्या पाण्याला काळसर हिरवट रंग आल्यामुळे आणि पाणी म्हणावं तसं प्रवाहित नसल्यामुळे माशांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. शिये पुलाजवळ नदीच्या दोन्ही बाजूस मासे मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. या ठिकाणी मृत माशांचा तसंच काळपट हिरवट झालेल्या पाण्याचा उग्र वास येत आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवाला नंतरच पाणी कशामुळे दूषित झालं हे समजणार आहे. सध्या तरी दूषित पाण्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी सोडून नदी प्रवाहित करणं हाच एकमेव उपाय आहे.

ML/KA/SL

3 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *