इथे प्राण्यांनाही मिळते रविवारची सुट्टी

रांची, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वत्र रविवारचा दिवस ही हक्काची सुट्टी मानली जाते. सोमवार उजाडताच नोकरदार लोकं पुढच्या रविवारच्या सुट्टीची वाट पहायला सुरू करतात. पण माणसाला शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाळीव पशुंच्या नशिबी अशी हक्काची सुट्टी असल्याचे फारसे आढळत नाही.कृषीप्रधान भारतात बैलपोळा सोडला तर मुक्या जनावरांना शेतीच्या कामातून फारशी सुटका नसते. बैलपोळ्याला देखील मिरवणूका काढून बैलांची दमवणूकच केली जाते. तसेच देशाच्या काही भागात नागपंचमीला शेतीच्या कामांना सुट्टी असते. मात्र भारतातील झारखंड राज्यातील एका गावात शेतीसाठी उपयुक्त पशुंना चक्क आठवड्यातून एकदा विश्रांतीसाठी हक्काची सुट्टी दिली जाते.
झारखंडच्या लातेहार गावात ही परंपरा प्रथम सुरू झाली. त्यानंतर आता जवळच्या हर्खा, मुंगर, लालगडी आणि पक्रर गावातही याचं अनुकरण करण्यात येत आहे.
याप्रथेमागे एक मोठं कारण सांगण्यात येततं. दहा दशकांपूर्वी शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी प्राण्यांनाही आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याचं ठरवलं. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा पाळली जाते.
गाय, म्हैस, बैल असे प्राणी माणसांना त्यांच्या कामात मदत करतात, उत्पन्न मिळवून देतात. कित्येकांच्या उत्पन्नांचं साधनच हे प्राणी आहेत. त्यामुळे असं ठिकाण जिथं या प्राण्यांना रविवारी आराम दिला जातो. त्यांच्याकडून कोणतंच काम करवून घेतलं जात नाही.
SL/KA/SL
8 Aug 2023