या तीन शहरांसाठी लवकरच होईल एकात्मिक घनकचरा प्रकल्प
ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंबरनाथ , बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा एकत्रित घनकचरा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याला शासनाची नुकतीच परवानगी मिळाली आहे अशी माहिती कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. An integrated solid waste project will soon come up for Ambarnath, Badlapur, Ulhasnagar – MP Shrikant Shinde
यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा पायलट प्रोजेक्ट राबविणार असून शहरातून निघालेल्या कचऱ्याचे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी क्लस्टर मॉडेल तयार करणार आहेत, हे 148 कोटींचे प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी 19 कोटी उल्ल्हासनगर आणि अंबरनाथ महापालिकेने दिले आहेत, एका बंद युनिट मध्ये हा कचरा टाकला जाणार आहे .587 टन कचऱ्याचे व्यवस्थापन यात होणार असून त्यातून फक्त 10 टन कचरा ग्राउंड वर टाकला जाईल.
साडे तेरा एकरवर हा प्रकल्प नियोजित असून येत्या एका वर्षात हा प्रकल्प सुरू होईल, या प्रकल्पासाठी 141 कोटी एम एम आर डी ए ने दिले आहेत असे डॉ शिंदे म्हणाले.यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर होणार असून हा घनकचरा व्यवस्थापनाचा महाराष्ट्रातील पहिला क्लस्टर प्रोजेक्ट असणार आहे असंही ते म्हणाले.
ML/KA/SL
16 Dec. 2022