डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे – अजित पवार

मुंबई, दि 5
- शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर त्यांचे विचार कधी आपण विसरु शकत नाही. हा देश अनेक धर्म, पंथ, भाषांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एकसंघ राहिलेला आहे हे स्पष्ट करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
महिलांना मोठया प्रमाणात संधी देताना समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. सन २०२९ मध्ये आपल्या महाराष्ट्रातून ९६ महिला या खास आरक्षित जागेतून आमदार होणार आहेत तसेच देशात खासदारांच्या ५४३ जागा असून तिथेही वन थर्ड महिला खासदार होणार आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोनं केले आहे. ज्या देशाने पुरुषाबरोबर महिलांना वागणूक दिली आणि संधी दिली, मानसन्मान दिला ते देश जगात पुढे आहेत असेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
आमच्या पक्षात नवा – जुना वाद नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व आहे. ज्याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
धुळ्यातील माजी खासदार डी. एस. अहिरे, सिंदखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनिल नेरकर, काँग्रेस किसान सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, धुळे महानगरपालिकेचे माजी सभापती हरिश्चंद्र वाघ, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अबीद पठाण आदी प्रमुख नेत्यांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी मंत्री अनिल पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, माजी आमदार शरद पाटील, नाशिक म्हाडाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया उपस्थित होते.