अजितदादा नाराज , महायुतीत बिघाडी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजपाने २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय गणिते जुळवण्यासाठी सोबत घेतलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांची नाराजी झाली असून त्यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
भाजपाने राज्यात सत्तेसाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीतील नाराज बहुसंख्य आमदारांना आपल्याकडे खेचून सत्तापालट केला मात्र स्वतःच्या आमदारांना सत्ता पदापासून दूर ठेऊन बाहेरून आलेल्या इतर पक्षियाना दिलेली पदे ही आता अपुरी पडू लागली आहेत. त्यातूनच आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी ची नाराजी स्पष्ट दिसू लागली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिल्याने या चर्चेला उधाण आले आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते आले नाहीत ,त्यातून वेगळे अर्थ काढू नका असे मुख्यमंत्री म्हणाले खरे मात्र अजितदादा नाराज आहेत अशी माहिती बाहेर आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन या नाराजी ची त्यांना कल्पना दिल्याचे समजते.
महायुतीत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्या हे विषय मार्गी लावा अशी अजितदादांची मागणी आहे, ती पूर्ण होत नसल्याने ते नाराज आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाची सुनावणी आहे. सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना किती काळ पदे न देता थोपविणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यामुळेच ते नाराज असून सात तारखेला दिल्ली येथे होणाऱ्या GST कौन्सिल बैठकीला ही ते जाणार नसल्याची चर्चा आहे, दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. Ajitdada is angry, failure in the Grand Alliance
ML/KA/PGB
3 Oct 2023