श्री साधक मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आम आदमीची मागणी.    

 श्री साधक मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आम आदमीची मागणी.    

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवी मुंबई त खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १३ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाले आहेत. या घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आम आदमी पार्टीने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

५० खोके देऊन आमदार विकत घेऊ शकता. परंतु मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तुटपुंजी रक्कम दिली जाते हा कोणता न्याय आहे? असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीने केला आहे.

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी  म्हटले आहे . की तुम्ही आपल्या अमदारांसाठी भाजपकडून ५० खोके घेऊ शकता. पण मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला फक्त ५ लाखाची मदत दिली जाते. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे आणि आम्ही तो कदापी सहन करणार नाही. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.Aam Aadmi demands that the Chief Minister should resign in the case of Mr. Sadhak’s death.

 

ML/KA/PGB
17 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *