देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात 370 कलम हटविण्यात आले, अयोध्येत राम मंदिर झाले, CAA लागू करण्यात आले, काशी, मथुरा येथे मंदिर व्हावे, लोकसंख्या नियंत्रण कायदा यावा आणि देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 8 करोड हिंदू आणि लाठ्या काठ्याचा मार खाणाऱ्या 8 लाख कारसेवकांच्या अश्रुंचे आणि बलिदानाचे स्मारक म्हणजे अयोध्येतील राम मंदिर असल्याचे ते म्हणाले.
आता हिंदू समाज सुरक्षित, समृद्ध आणि सन्मानाने जगावा यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेद्वारे हनुमान चालीसा केंद्र चालविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात 1 लाख हनुमान चाळीसा केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. मी हिंदूंचा नेता आहे आणि मी हिंदूंच्या हितासाठी काम करीत राहणार. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायला हवं असेही ते म्हणाले. A uniform civil law should be implemented throughout the country
PGB/ML/PGB
19 March 2024