देहरजी धरणातील पहिला अंशत: जलसाठा साध्य झाल्याने गाठला मोठा टप्पा

मुंबई दि २६– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) जो देहरजी धरण प्रकल्पासाठी निधीपुरवठा करत आहे आणि ज्याची अंमलबजावणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ (KIDC) मार्फत केली जात आहे ,त्या पालघर जिल्ह्यातील देहरजी प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
विक्रमगड क्षेत्रात पावसाने नियमित हजेरी लावल्याने २२ जून, २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता देहरजी धरणातील पाण्याने ५.१४७ दशलक्ष घनमीटरची (एमसीएम) पातळी गाठली. या धरणाच्या एकूण ९५.६० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेच्या ५% इतके हे धरण भरले आहे. धरणाच्या जलसाठ्याची सापेक्ष पातळी ९०.०० मीटरपर्यंत वाढली. त्यामुळे स्पिलवेवर १०९.१४ दशलक्ष घनमीटर/सेकंद या गतीने विसर्ग करण्यात आला. धरणात पाणी साठण्याची ही पहिलीच वेळ होती आणि यातून धरणाची कार्यक्षमता तसेच त्याच्या बांधकामाचा भक्कमपणा सिद्ध झाला.
धरणाच्या ९० मीटर सापेक्ष पातळीपर्यंत अंशतः जलसाठा निर्माण झाला आहे. या ठिकाणी नदीच्या तळाच्या ६६.३६ या सापेक्ष पातळीशी तुलना करता धरणामध्ये सुमारे २३.६४ मीटर इतकी पाण्याची सापेक्ष खोली साध्य करण्यात आली आहे.
हा टप्पा म्हणजे या प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अंमलबजावणीच्या यशाचे प्रतीक आहे. या प्रकल्पातून एमएमआरडीएची जलसुरक्षेप्रती असलेली वचनबद्धता, प्रादेशिक पातळीवर सर्वांचा समान विकास करण्याचे प्रयत्न आणि हवामान बदलाशी जुळवून घेत उभारलेल्या पायाभूत सुविधा प्रतिबिंबित होतात.
प्रकल्पाचा आढावा
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर देहरजी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बांधकामासाठी माती व दगडांचा वापर केला असून एमएमआरडीएच्या अर्थसहाय्याने केआयडीसीतर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये :
- एकूण साठवण क्षमता: ९५.६० दशलक्ष घनमीटर
- वापरयोग्य साठवण: ९३.२२ दशलक्ष घनमीटर (२५५ दशलक्ष लिटर प्रति दिवस)
- मुख्य धरण : लांबी – २४५० मीटर | उंची – ७१.६० मीटर
- स्पिलवे : लांबी – ६१.७५ मीटर, ४ रेडियल गेट्स (प्रत्येकी १२ मीटर x ६.५ मीटर)
बांधकामातील प्रगती आणि तांत्रिक टप्पे (मे २०२५ पर्यंत):
- कंत्राटदार : मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. (टेंडर २७.०७.२००६ रोजी देण्यात आले)
- उत्खनन प्रारंभ : मे २०२२
- धरणाचे काँक्रिटीकरण सुरू : नोव्हेंबर २०२२
- एकूण प्रत्यक्ष प्रगती : ~८०% पूर्ण
- वनविभागाची मंजुरी : ४४५.२९ हेक्टरसाठी पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाकडून टप्पा-२साठी मंजुरी (१९.०२.२०१६)
- सर्व कायदेशीर परवाने प्राप्त झाले.
भूसंपादन आणि पुनर्वसन :
- खासगी भूसंपादन : निमज्जन क्षेत्रासाठी २३८ हेक्टर भूभाग संपादित करण्याचे कार्य सुरू आहे.
- पुनर्वसन : खुळेद, साखरे आणि जांबे गावांतील २६९ प्रकल्पबाधित कुटुंबांना पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सहाय्य देण्यात येत आहे*
निधी आणि शासन संरचना :
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आतापर्यंतचे योगदान : ₹१६८९.४२ कोटी
१. ₹३६४.८२ कोटी – भूसंपादन आणि पुनर्वसन - एकूण सुधारित प्रशासकीय मंजुरी : ₹२५९९.१५ कोटी
- शासकीय ठराव : सुप्रामा – २०२५/(नं.२२/२५) दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५
- प्रकल्प पूर्ण होण्याचे लक्ष्य: २०२७च्या अखेरीस*
जलवाटपाचे नियोजन आणि लोकांचा फायदा :
प्रकल्प सुरु झाल्यानंतर देहरजी धरणातून दर दिवशी २५५ दशलक्ष लिटर (एमएलडी) इतका खात्रीशीर पाणीपुरवठा होईल, जो पुढीलप्रमाणे वितरित करण्यात जाईल:
- १९० एमएलडी – वसई-विरार महानगरपालिका (व्हीव्हीएमसी)
- ५० एमएलडी – सिडको पालघर क्षेत्र
- १५ एमएलडी – पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी
एमएमआरडीए सध्या सर्वसमावेशक पेयजल पुरवठा योजनेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार कर आहे, जेणेकरून या भागातील शहरी व निम-ग्रामीण भागांना समान व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होईल. ML/ML/MS