*सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, सेवांचे खाजगीकरण करू नका

मुंबई. दि.12
भाजपा सरकारने आपल्या ‘मुंबई विका’ योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचेही खाजगीकरण करण्याचा घाट मुंबई महानगरपालिका प्रशासकाच्या माध्यमातून घातला आहे. या विभागात काम करत असलेल्या ३२ हजार सफाई कामगारांना, त्यांच्या वारसांना आणि मुंबईतील गरीब कष्टकरी माणसाला उध्वस्त करून हा प्रकल्प आपल्या लाडक्या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे टिका काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सरकारवर केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीसाठी मुंबईतील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवा प्रकल्प कंत्राटदारांना देण्याचे काम करत असून मुंबईतील कष्टकरी कामगारांना, जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे.
या निर्णयाला मुंबई काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार, मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवांचे खाजगीकरण करू नये असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
KK/MS