सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार अर्पण करण्यास बंदी!

मुंबई, दि. ११ : आजपासून प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात नारळ आणि फुले अर्पण करण्यास मंदिर प्रशासनाने बंदी घातली आहे. भारत-पाक तणावाच्या परिस्थितीमुळे दररोज हजारो भाविकांची गर्दी होणारे हे मंदिर अतिरेक्यांच्या निशाणावर आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आजपासून (११ मे) मंदिरात नारळ आणि माळा प्रसाद नेण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा ट्रस्टने केली आहे.
सदा सरवणकर म्हणाले, ” कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी, मंदिर ट्रस्टने काही काळासाठी मंदिरात हार आणि नारळाचा प्रसाद देण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. मंदिर ट्रस्टने बाहेरील फुल विक्रेत्यांना ११ मे पूर्वी त्यांचा साठा संपवण्याचे आदेश दिले आहेत. ११ मे पासून मंदिराबाहेर कोणतेही फुलांचे दुकान सुरू केले जाणार नाही आणि भाविकांना फुले घेऊन मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.”