भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर

 भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली, दि. ७ : पहलगाम दहशतादी हल्ल्याचा बदला म्हणून काल रात्री भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आज पाकच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्यात आल्या आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सांगितले की, या हल्ल्यात किमान २६ लोकांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने मध्यरात्रीनंतर पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला केला.

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राला तात्पुरते बंद करण्यात आले होते, परंतु आता ते अंशतः खुले करण्यात येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *