सर्वोच्च न्यायालयावर उपराष्ट्रपती नाराज, केली जाहीर टीका

नवी दि, १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “आपल्याला आता अधिक संवेदनशील व्हावे लागेल. राष्ट्रपतींना कालमर्यादा ठेवून निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. तसं न झाल्यास संबंधित विधेयकाचे कायद्यात रुपांतर होते. अनुच्छेद 142 हे न्यायव्यवस्थेसाठी न्यूक्लियर मिसाईल ठरत आहे. या अनुच्छेदाचा वापर लोकशाही प्रक्रियेला पाठ दाखवण्यासाठी केला जात आहे,” अशा परखड शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कामावर टिका करत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवलेल्या विधेयकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेतला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते. या निर्देशांवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय कायदेमंडळाचे काम करत असून स्वतःला सुपर संसद समजत असल्याची टीका धनखड यांनी केली.
SL/ML/SL
14 April 2025