मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेचा कहर झाला आहे. मार्च महिन्याच्या मध्यातच राज्यातील धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने खालावत असताना मुंबईकरांसाठीही चिंतेची बातमी आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.सध्या या धरणांमध्ये एकूण ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन मुंबई मनपाकडून करण्यात येत आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणाची क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.

SL/ML/SL

16 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *