‘आमच्या जमिनीवरून भारताविरोधी कारवाया होणार नाहीत”, तालिबानने दिलं भारताला आश्वासन

पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून खूप तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून भारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान तालिबानने भारताला ‘’आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, असं आश्वासन दिले आले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांच्यामध्ये दुबईत झालेल्या भेटीवेळी तालिबानकडून हे आश्वासन देण्यात आले.