ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात, शेतकरी चिंतेत…

 ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात, शेतकरी चिंतेत…

जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेले हरभरा पीक धोक्यात आले आहे यामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पिंपळगाव रेणुकाई परिसरात सुमारे 19 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आलीय. मात्र, भोकरदन तालुक्यात मागील 2/3 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी देखील लावली आहे. त्यामुळे ऐन फुलोऱ्यात आलेल्या हरभरा पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका असत आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

ML/ML/SL

27 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *