पंतप्रधान आवास योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार ‘घरकुल’

 पंतप्रधान आवास योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार ‘घरकुल’

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच घरकुल योजना. याच योजनेसाठी सामाजिक आणि आर्थिक जनगणनेनुसार २०११ आणि आवास २०१८ च्या सर्वेक्षणानुसार लाभार्थीची निवड केली जाते. परंतु या सर्वेक्षणातील जाचक अटी शिथिल करण्याची घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी (ता. २३) पुण्यातील एका कार्यक्रमात केली.

या योजनेतून बेघर कुटुंबांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. त्यासोबतच कच्चे घर असणाऱ्यांना घर दिलं जात. पण त्यामध्ये जर अडीच एकरपेक्षा म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती सिंचनाखाली असलेली शेतकरी या योजनेला अपात्र ठरत होते. त्यामध्ये मात्र आता बदल करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल आणि ती शेती सिंचनाखाली असेल तरी या योजनेस संबंधित शेतकरी पात्र ठरणार आहे. तसेच ५ एकर म्हणजे दोन हेक्टर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे.

SL/ML/SL

24 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *