मी आधुनिक अभिमन्यू , मला चक्रव्यूह भेदता आले.

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मी महाभारतातला आधुनिक अभिमन्यू असून मला चक्रव्यूह भेदता आले .मला सातत्याने टार्गेट केल्यामुळेच माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असे टोले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना हाणले .
राज्यपालांच्या अभिभाषणावरती आभार प्रदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेली पाच वर्ष संक्रमणाची होती, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर सातत्याने टीकेची जोड उठवण्यात आली, आम्हाला सगळ्यांनाच सातत्याने टार्गेट करण्यात आले. त्यामुळेच माझ्याबद्दल राज्याच्या जनतेत सहानुभूती निर्माण झाली असे फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात सांगितले जनतेने तब्बल 50% मते देऊन जातीय, धर्मीय ध्रुवीकरण निष्क्रिय केले असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
विरोधकांचे फेक नरेटीव्ह आम्ही थेट नॅरेटिव्हने निष्प्रभ केले. विरोधकांची फेक नरेटिव्हची फॅक्टरी आम्ही उध्वस्त केली. ती पुन्हा नव्याने उभी करण्याचं काम सध्या विरोधक करत आहेत, मात्र ही फॅक्टरी देखील पुन्हा उध्वस्त केली जाईल असेही फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. यावेळी विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारीच त्यांनी सादर करत जनतेने आम्हाला कशा पद्धतीने निवडून दिले याचे गणित विरोधकांसमोर मांडले. त्यामुळे ईव्हीएम वर शंका घेणाऱ्यांनी आपण संविधानावरती शंका घेत आहोत याचे भान ठेवावे असेही बजावले .
जनतेने दिलेला कौल स्वीकारा अन्यथा भ्रमात राहिलात तर पुन्हा हेच भोगावे लागेल असेही सुनावत फडणवीस यांनी देश देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना विरोधकांनी आपला खांदा वापरण्यासाठी देऊ नये असे आवाहन केले. आपल्या भाषणाच्या शेवटी महाराष्ट्र आता थांबणार नाही असे ब्रीदवाक्य ऐकवत विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल, मराठी माणसांचे स्वप्न आता भंगणार नाही, दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, उपाशीपोटी कोणी झोपणार नाही आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा आशयाच्या ओळी उधृत करत आज सभागृहामध्ये चांगलेच चौकार षटकार ठोकले.
ML/ML/PGB 19 dec 2024