लातुरमधील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनींवर कक्फ बोर्डाचा दावा

 लातुरमधील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनींवर कक्फ बोर्डाचा दावा

लातुर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात ठिकठिकाणी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. या वक्फ बोर्डाने आता शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.

वक्फ न्याय प्राधीकरणाकडून लातूर जिल्ह्यातील आणखी 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे. त्यासंदर्भाने शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगाव नंतर आता लातुरच्याच औसा तालुक्यातील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस आली आहे. त्यानुसार, 175 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आला आहे. याबाबत, शेतकऱ्यांनी तात्काळ कोर्टात धाव घेतली. मात्र, या घटनेने येथील शेतकरी वर्गात मोठी धांदल उडाली आहे. यापूर्वी तळेगाव येथील 300 एकर जमिनीवर दावा करत शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

लातूरच्या बुधोडामध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली आहे. जिल्ह्यातील तळेगाव नंतर लातूर जिल्ह्यातील दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला. शेतकऱ्यांच्या जवळपास 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. औसा तालुक्याच्या बुधोडा गावातील 25 शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत.

काही दिवसांपर्वी या गावातील शेतकऱ्यांना कोर्टाची नोटीस आली. या पंचवीस शेतकऱ्यांची मिळून 175 एकर जमीन या भागात मागील अनेक पिढ्यापासून आहे. या जमिनीवर आता दावा करण्यात आला आहे, तो दावा वक्फ बोर्डकडून करण्यात आला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काजी यांच्या माहितीनुसार तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस या एका व्यक्तीने कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीस वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. असे स्पष्टीकरण महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून देण्यात आले आहे.

SL/ML/SL

13 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *