पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी

 पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर संपर्कजाल असलेल्या भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ता झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे. कर्मचारी कमीत कमी २ वर्षी किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत काम करु शकतील.

रेल्वेच्या १ ते ७ या श्रेणीमध्ये काम करणारे कर्मचारी यासाठी पात्र असतील. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीने होणार असून त्यांना कंत्राटदाराच्या मार्फत वेतन दिले जाणार आहे. रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. याला रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचारी या संधीचा लाभ घेतात का हे पाहता येणार आहे.

SL/ML/SL

18 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *