मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकलो नाही ही चूकच

 मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकलो नाही ही चूकच

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आम्ही सत्तेत असताना मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ शकलो नाही ही आमची चूकच असल्याचे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केले, यावेळी मात्र सत्तेत आल्यावर ते लगेच देऊ असेही ते म्हणाले. एका दूरचित्रवाहिनी कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी आमच्या सरकारने अध्यादेश काढला मात्र तो न्यायालयात टिकला नाही, त्याचप्रमाणे आरक्षण देता आले नाही ही चूकच झाली. आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील ही चूक मान्य केली आहे. गांधी यांनी म्हटल्यानुसार जाती निहाय जनगणना झाल्यावर मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल असे ही पटोले यांनी यावेळी सांगितले.

आमचे सरकार असताना आम्ही जातनिहाय जनगणना करू शकलो नाही ही देखील चूकच असल्याचे खुद्द राहुल गांधी यांनीच मान्य केले आहे, मात्र आता आम्ही सत्तेत आल्यावर ही गणना करून आरक्षणाची मर्यादा शंभर टक्क्यांवर नेऊन सर्वानाच आरक्षण मिळेल अशी व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली आहे.

PGB/ML/PGB
18 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *