कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश

 कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश

भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यावर कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारताने याची गंभीर दखल घेत उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले आहे. तसेच यावेळी भारताने कॅनडाच्या सरकारवर विश्वास नसल्याचंही म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं की, सध्याच्या कॅनडा सरकारच्या सुरक्षेच्या खात्रीसंदर्भातील वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं. कॅनडाचे अधिकारी म्हणतात की, ‘RCMP ने आमच्या राष्ट्रीय टास्कफोर्स आणि इतर तपासांद्वारे बरेच पुरावे मिळवले आहेत.’

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *