राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले

 राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले

कोल्हापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून ४ हजार ३५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु केला आहे. यामुळे 2३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राधानगरी, शाहूवाडीत जोरदार पाऊस असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे.यात कापणीला आलेल्या भातपिकाचं चांगलंच नुकसान झाले आहे.

बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यात सरीवर सरी कोसळत राहिल्या असून याकाळात आजवर अधूनमधून पाऊस व्हायचा. मात्र, जोरदार कोसळत राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. बुधवार दि.११ पर्यंत जिल्ह्यात मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून राधानगरी परिसरात सुरु असणाऱ्या संततधार पावसामुळे रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले.

दोन्ही दरवाजातून २ हजार ८५६ क्युसेक्स विसर्ग चालू आहे; तर वीजनिर्मिती केंद्रातून १हजार ५०० क्युसेक्स असा एकूण ४ हजार ३५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. धरणाची पाणीपातळी ३४७ फूट असून, पाणीसाठा ८३२७ दशलक्ष घनफूट आहे. १ जूनपासून आजअखेर एकूण पाऊस ५३४२ मि. मी. झाला आहे.

चार दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे राधानगरीसह पश्चिम
भागातील पोसवायला (कापणीला) आलेल्या भातपिकाचं चांगलंच
नुकसान झाल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत आहे. राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, भुदरगड येथे तुलनेत अधिक पाऊस झाला आहे.
धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला आहे. आज सकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची पातळी २३ फुटांवर होती.

ML/ML/PGB
9 Sep 2024

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *