गणपती उत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संप

सिंधुदुर्ग दि ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- आज राज्यभरात पुकारण्यात आलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले, या संपकरी कर्मचाऱ्यांशी सरकारच्या वतीने करण्यात आलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. राज्यातील विविध डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या.
राज्यातील विविध डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने प्रवासी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात दाखल होतात आणि अशावेळी हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत. रस्त्यासाठी गेलेल्या बसने विद्यार्थी शहरात आले असून माघारी जाण्यासाठी त्यांना बसफेरी नसल्याने आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने संप मिटवावा अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने प्रवासी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात दाखल होतात आणि अशावेळी हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत. वस्त्यासाठी गेलेल्या बसने विद्यार्थी शहरात आले असून माघारी जाण्यासाठी त्यांना बसफेरी नसल्याने आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने संप मिटवावा अशी मागणी होत आहे.
आज संपकरी कर्मचाऱ्यांशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चा केली मात्र त्यात काही मार्ग निघू शकला नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यानी लेखी आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेऊ अशी कर्मचारी नेत्यांची भूमिका आहे.
गणेशोत्सव तोंडावर असताना अचानक संप पुकारून प्रवाशांना वेठिला धरणे योग्य नाही असे मत मंत्री सामंत यांनी व्यक्त केले आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे मात्र कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणे योग्य नाही असे सामंत म्हणाले.
ML/ML/SL
3 Sept 2024