कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप ; पूर संथगतीने कमी

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचं पाणी एकदम संथगतीनं कमी होत आहे. कृष्णेसह पंचगंगा, वारणा
आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत इंचाइंचानं घट होत आहे. त्यामुळे गेल्या चौदा दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती कायम आहे. पुरामुळे शिरोळ तालुक्यात बारा हजारांहून अधिक पूरग्रस्त स्थलांतरीत झाले आहेत. चार हजारांहून अधिक जनावरांनादेखील स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
पूर पातळीत घसरण होत असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी सात वाजता चाळीस फूट आठ इंचावर होती. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले आहेत त्यामुळे अद्याप ६८ बंधारे पाण्याखाली असल्यानं एसटीचे २० मार्ग बंद आहेत. १० राज्य, तर ४५ प्रमुख जिल्हामार्ग असे ५५ मार्ग बंद आहेत.
पिकं सलग दहा दिवस पाण्यातअसून पडझडीत काल ७५ मालमत्तांचं २२ लाखांचं नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली.धरणक्षेत्रात मात्र पाऊस असून, विसर्ग कायम आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असून, त्यातून
प्रतिसेकंद ४ हजार ३४६ घनफूट पाणी भोगावतीमध्ये येत आहे. पाऊस कमी झाल्यानं पंचगंगा नदीची पातळी अत्यंत संत गतीनं कमी होत असून ती आज सकाळी सात वाजता ४१.८ फुटांपर्यंत आली होती.
नदीकाठची पिकं सलग आठ दिवस पाण्याखाली असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली
आहे.नदीकाठची ऊस, भात, सोयाबीन पिकं दहा दिवस
पाण्याखाली असल्याने मोठा फटका बसणार असल्यानं शेतकरी चिंतित आहे. गेली दोन दिवस पाऊस काहीसा कमी आहे, तरीही दिवसभर उघडझाप असली, तरी रात्री अधूनमधून जोरदार
सरी कोसळत राहिल्या. राधानगरीचे ६ आणि ७ क्रमांकाचे दरवाजे खुले असून, त्यातून ४ हजार ३५६ घनफुट विसर्ग सुरू आहे. त्यात वारणातून ११ हजार ५७०, दूधगंगेतून ९ हजार २५० घनफूट पाणी बाहेर पडत असल्यानं पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागलं आहे.
ML/ ML/ SL
5 August 2024