दीड महिन्याने पाऊस परतला, पिकांना जीवदान…

नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार सुरू असल्याने या परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, वैतरणा, भावली, नांदूर मधमेश्वर धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या तीन दिवसापासून पावसाचे रिपरिप सुरू असल्यामुळे बळीराजाला देखील दिलासा मिळाला आहे, खरीप पिकाला ही जीवदान मिळाले आहे.
ML/ML/SL
26 July 2024