निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अंदाजे 60.22 टक्के मतदान

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये काल १९ एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- रामटेक 58.50 टक्के,
- नागपूर 53.71 टक्के,
- भंडारा- गोंदिया 64.08 टक्के,
- गडचिरोली- चिमूर 67.17 टक्के आणि
- चंद्रपूर 60.03 टक्के
ML/ML/SL
20 April 2024