शेतकऱ्यांसाठी जीएसटी हद्दपार करू; राहुल गांधींनी दिले आश्वासन

नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज राहुल यांची भारत जोडो यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली, नाशिकच्या द्वारका चौक पासून यात्रेला सुरुवात झाली, जुने नाशिक, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार त्र्यंबक रोड मार्गे हा रोड शो संपन्न झाला. भर दुपारी तळपत्या उन्हात लाखोंच्या संख्येने नागरिक राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, आकाश छाजेड, राहुल दिवे, स्वप्निल पाटील आदिलसह काँग्रेस सह आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. राहुल गांधी यांनी रोड शोच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधला, जोपर्यंत शेतकऱ्याची अवस्था समजून घेत नाही आणि शेतकऱ्याच्या कष्टाचा आदर करत नाही तोपर्यंत तो शेतकऱ्याला मदत करू शकत नाही, असे राहुल यांनी बैठकीत सांगितले.
आमच्या सरकारचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील. दिल्लीत शेतकऱ्यांचे रक्षण करणारे सरकार आहे असे तुम्हाला वाटेल. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी जीएसटी हटवू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. रोड शो नंतर राहुल गांधी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देतील. त्यानंतर भारत जोडो यात्रा पालघरकडे रवाना होणार आहेत. Banish GST for Farmers; Rahul Gandhi promised
PGB/ML/PGB
14 March 2024