राज ठाकरे यांनी केली बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न ‘ देण्याची मागणी

 राज ठाकरे यांनी केली बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न ‘ देण्याची मागणी

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज चौधरी चरणसिंग, पी.व्ही, नरसिंहराव आणि एम.एमस स्वामीनाथन या मान्यवरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.त्या आधी मागील आठवड्यात ज्येष्ठ भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आजपर्यंत यावर्षी जाहीर झाल्या भारतरत्नांची संख्या आता पाच झाली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सरकारने इतरांना दाखवेलं औदार्य हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत दाखवून त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत केली आहे.राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतले एस. स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.

तसेच बाकी पी. व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

SL/KA/SL

9 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *