राज्यातील शिक्षकांची भरती प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण

नागपूर, दि. ११ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
न्यायालयीन स्थगितीमुळे आधी ही प्रक्रिया थांबली होती, आता रोस्टर तपासणी करून संबधित उमेदवाराला त्याच्या जिल्ह्याची निवड करण्याची संधी दिलेली आहे ती त्यांनी दिली की ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं मंत्री म्हणाले.
शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची योजना राबविली जात आहे , पालघर , ठाणे आणि बुलडाणा जिल्ह्यात मात्र विशेष योजना राबविण्याचे निर्देश आपण दिल्याचं ते म्हणाले. शाळांची पटसंख्या कमी होऊ नये यासाठी नवे धोरण आणून बालवटिका सुरू करून त्यात शिशु वर्ग सुरू करून ते मुख्य शाळेला जोडले जाणार आहेत असं मंत्री केसरकर यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , जयंत पाटील, आशिष शेलार, नाना पटोले, योगेश सागर , यशोमती ठाकूर आदींनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
मध्यान भोजन योजना
शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजना दर्जेदार राहावे यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील मध्यवर्ती भोजनगृहाना प्रशिक्षण दिले जाते आहे त्यापैकी २५ जिल्ह्यांचे ते पूर्ण झालं आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अबू आझमी यांनी तो उपस्थित केला होता त्यावर मनिषा चौधरी , वर्षा गायकवाड आदींनी उपप्रश्न विचारले होते.
ML/KA/SL
11 Dec. 2023