टिकणाऱ्या आरक्षणासाठी वेळ लागेल, तोवर उपोषण मागे घ्या

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्व पक्षियांचा पाठिंबा आहे मात्र कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी वेळ लागेल तोवर सहकार्य करून मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असा ठराव आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला.
आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, नाना पटोले , बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, अनिल परब यांच्या सह बहुतांश सर्व पक्षांचे नेते आणि राज्याचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत आरक्षण देण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत आणखी काय करायला हवे यावर सविस्तर चर्चा झाली.केंद्र सरकारने यात पुढाकार घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली.
बैठकीच्या शेवटी एक ठराव संमत करण्यात आला त्यानुसार आरक्षणाच्या मागणीला सगळ्यांचा पाठिंबा आहे मात्र कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी वेळ लागेल, तो देणे आवश्यक आहे. यादरम्यान सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. ही हिंसा थांबवावी अशी विनंती आंदोलकांना करण्यात आली असून सरकारी प्रयत्नांना सहकार्य करून तोवर आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन या सर्व नेत्यांनी मनोज जरांगे यांना केले आहे.
ML/KA/SL
1 Nov. 2023