या १० जिल्ह्यांतून होतात देशातील ८०% सायबर गुन्हे

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाईन व्यवहार वाढल्याने देशातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुलभ झाले असले तरीही साबयर क्राईमने उच्चांक गाठला आहे.सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन व्यवहारातून हातोहात फसवणूक होऊन त्यांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. याबाबत आयआयटी कानपूर यांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांतील एकूण १० जिल्ह्यांतून देशातील ८० % ऑनलाईन गैरव्यवहार होत असल्याचे धक्कादायक वास्तव या अभ्यासातून समोर आले आहे.
फ्युचर क्राईम रिसर्च फाऊंडेशन ( FCRC ) या नॉन प्रॉफीट संस्थेच्या माध्यमातून आयआयटी कानपूर संस्थेने हा अभ्यास केला आहे. या प्रकरणी एक व्हाईट पेपर काढण्यात आला आहे. त्याचे नाव ‘ए डीप ड्राईव्ह इनटू सायबर क्राईम ट्रेंड इम्पॅक्टींग इंडीया’ असे त्याचे नाव आहे.
‘ए डीप ड्राईव्ह इनटू सायबर क्राईम ट्रेंड इम्पॅक्टींग इंडीया’ या पेपरमध्ये दिलेल्या माहीतीनूसार देशातील दहा जिल्हे सायबर क्राईमचे हॉट स्पॉट बनले आहेत. त्यातूनच देशभरातील 80 टक्के सायबर क्राईम घडविण्यात येत आहेत. या जिल्ह्यात भरतपूर ( 18 टक्के ), मथुरा ( 12 टक्के ), नूंह ( 11 टक्के ), देवघर (10 टक्के ), जामतारा ( 9.6 टक्के ), गुरुग्राम ( 8.1 टक्के ), अलवर ( 5.1 टक्के ), बोकारो ( 2.4 टक्के ), कर्मा तंड ( 2.4 टक्के ) आणि गिरीधीह ( 2.3 टक्के ) यांचा समावेश असल्याचे फ्युचर क्राईम रिसर्च फाऊंडेशन ( FCRC ) संस्थेने म्हटले आहे.
भारतातील टॉप 10 सायबर क्राईम जिल्ह्यांच्या विश्लेषणातून नागरी शहरांशी भौगोलिक जवळीकता, आर्थिक आव्हाने, सायबर सुरक्षेविषयी अपु्ऱ्या पायाभूत सुविधा, अत्यंत कमी डीजीटल साक्षरता अशी काही सामायिक कारणे यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. केवायसी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील सोपी पडताळणी प्रक्रिया गुन्हेगारांना बनावट ओळख निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे.
SL/KA/SL
24 Sept. 2023