काळम्मावाडी धरणाच्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू

कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काळम्मावाडी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं या धरणाच्या पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, हा विसर्ग कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Discharge of water from Kalammavadi dam continues in the riverbed
गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड आणि करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर असून
कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.धरण परिक्षेत्रात आज दिवसभरात २६
मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज अखेर १९०२ मिलिमीटर पाऊस
होऊन धरणात १९.७० टी.एम.सी म्हणजे
८० टक्के इतका पाणीसाठा आहे. पाऊस उशिरा सूरू झाला असला तरी गेल्या काही दिवसात संततधार पावसामुळे धरण
पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.यावर्षी धरणात केवळ मृत पाणी साठा
शिल्लक होता. यामुळे जिल्ह्यावर पाणी
टंचाईचे संकट ओढावले होते. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या
पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.
जलाशय परीचलन
सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरिता आज धरणाच्या वक्रद्वारातून आणि विद्युत गृहातून नदीपात्रात टप्प्या टप्प्याने २००० क्युसेक विसर्ग
सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूधगंगा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होणार आहे.
नदीकाठच्या नागरिकांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे.
ML/KA/PGB
5 Aug 2023