फडणवीस म्हणाले दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा….

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा ईशारा देत याला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते आज उत्तर देत होते.
गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी विविध उपपयोजना राबवल्या जात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे असं ते म्हणाले. लव जिहाद संदर्भात वेगवेगळ्या राज्याच्या कायद्यांचा अभ्यास केला जाईल आणि त्यातील उपयुक्त असेल ते घेऊन आपल्या राज्यातील कायद्यात बदल केलं जाईलअसं त्यांनी सांगितलं.
रत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल असं सांगत त्यांनी या प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर झालेल्या मारहाणीचा आरोप फेटाळून लावला . या आंदोलकांनी न्यायालयात कोणतीही मारहाण झाली नसल्याचं सांगितलं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. काही लोकांना देशाचा विकास नको आहे तीच लोकं विविध प्रकल्पांना सातत्याने विरोध करत आहेत या लोकांचा संबंध आपल्याकडे बंदी घातलेल्या ग्रीन पीस या सामाजिक संस्थेशी आहे.
याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.
बारसू इथं असलेल्या कातळ शिल्पांचं संरक्षण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.आपल्या इथे या प्रकल्पाला विलंब होत असल्यामुळे सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी यात गुंतवणूक करणार होती ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे असं ते म्हणाले.निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही, निवडणूक आयोगाने पालिकेच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे आणि निवडणूक आयोग स्वायत्त आहे असं सांगत त्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला.
आम्हालाही निवडणुका हव्या आहेत ,आपण सगळे मिळून निवडणूक आयोगाकडे जाऊन निवडणुका घेण्याची मागणी करूयात असा टोला त्यांनी लगावला Fadnavis said to destabilize the state by creating riots..
वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही नियम मोडून प्रवेश करणाऱ्यांना पोलिसांनी अडवलं असं फडणवीस यांनी सांगितलं. ख-या माथाडीना संरक्षण देवू पण जे मर्सिडीज गाडीतून येवून वसुली करतात त्यांच्यावर कारवाई करणार असं फडणवीस म्हणाले.
ML/KA/PGB
4 Aug 2023