विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांची नियुक्ती

 विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांची नियुक्ती

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. आपल्याला काँग्रसच्या गटनेत्याकडून यासाठी पत्र मिळालं आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपला दावा मागे घेतल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

यानंतर सर्व पक्षीय गटनेते , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी त्यांना त्यांच्या आसनाकडे नेऊन त्यांना आसनस्थ केले. यादरम्यान अजित पवार यांनी त्यांना थेट सत्तारूढ आसनांकडे नेल्यावर सभागृहात हशा पिकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. विदर्भाच्या पाण्याचा वेगळा गुण असतो . पाहुणचार करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. बेधडक स्वभावाचे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती खरे तर अधिवेशनाच्या सुरुवातीला च अपेक्षित होती असं मुख्यमंत्री म्हणाले.

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एका रथाची दोन चाके आहेत, सक्षम लोकशाही साठी विरोधी पक्षनेते पद आवश्यक असते.आवश्यक त्यावेळी टीका आणि सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुक करणं अपेक्षित आहे.मूळ शिवसैनिक असलेल्या वडेट्टीवार यांची कामाची पद्धत आक्रमकच असं ते म्हणाले. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यानी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता अनेक चिमटे काढले.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

विदर्भाचा बुलंद आवाज असणारे आज विरोधी पक्षनेते झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जनतेच्या भल्यासाठी शासनाकडून अनेक चांगले निर्णय हे पद करून घेऊ शकते. या पदाचा मान सन्मान ते उंचावतील अशी अपेक्षा आहे , जमिनीवर कायम असणारा हा नेता आहे असं ते म्हणाले.

हे पद मानाचं आणि जबाबदारीचे देखील , राज्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते यांच्याकडे आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या.

वडेट्टीवार यांचे ऊत्तर

एकमेकांचे गुणदोष काढण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मांडण्यावर माझा भर असेल सत्ताधाऱ्यांनी यासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात केली.

एकीकडे दोनशे सत्ताधारी आणि आमची संख्या कमी तरीही आम्ही लढू , लढण्यासाठी सामर्थ्य आणि इमानदारी लागते ती माझ्याकडे आहे असं ते म्हणाले. संख्येच्या बळावर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न झाला तर ते लोकशाही ला मारक ठरेल असं वडेट्टीवार म्हणाले.

याआधी काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी चे जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव, काँग्रेसच्या नाना पटोले, भाजपच्या कालिदास कोळंबकर आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या अभिनंदन पर भाषणे केली.

ML/KA/SL

3 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *