तानसा पाठोपाठ मोडक सागर धरण भरले
ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी शहापूर तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे मोडक सागर धरण काल रात्रीनंतर तुडुंब भरून वाहू लागले.
काल रात्री ठीक 10:52 वा. मोडक सागर धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले असून 6000 क्यूसेक ने वैतरणा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वैतना नदीच्या परिसरातील पालघर जिल्ह्यातील सोनाळे, बिलघर, तीलसे, वाडा, मनोहर, आणि वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
ML/KA/PGB
27 July 2023