येत्या आठवड्यात राज्यात धुवाधार पाऊस
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरात मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने येत्या २ ते ३ दिवसात राज्यभरात विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुवाधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान पूर आणि दरडी सारख्या घटनांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी NDRF टिमसह स्थानिक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणच्या पावसाचे प्रमाण पाहून खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाला शाळा बंद ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
यंदा मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी रुजलेले बियाणे वाहून गेल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिके बराचकाळ पाण्याखाली राहील्याने त्यांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगाम अखेर महागाई वाढण्याचा धोका टाळण्यासाठी केंद्राकडून बहुतांश अन्नधान्य पिकांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
SL/KA/SL
25 July 2023