गारपिटीच्या फटक्यामुळे हजारो क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी उकीरड्यावर फेकला.

वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यातील उमरी परीसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उपादन घेतात. यंदाही मोठ्या प्रमाणात या परिसरात कांद्याची लावगड करण्यात आली होती. मात्र ऐन कांदा काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो क्विंटल कांदा सडला. त्यामुळे लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मागील तीस वर्षापासून उमरी, ‘फुलउमरी, सोमेश्वर नगर, शेंदोना, ) वंसतनगर या गावातील शेकडो शेतकरी कांद्याचे भरघोस उत्पन्न घेतात. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस आल्याने काढणीस आलेला व काढलेला कांद्या सडत असून, ‘शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. साठवलेल्या कांद्याची दररोज छाटणी करण्याची पाळी आली आहे. शेतकरी दररोज हजारो क्विटल कांदा उकीरड्यावर फेकत असून, सडलेल्या कांद्याची दुर्गंधी गावभर पसरत आहे.

ML/KA/PGB 28 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *