ईशान्य भारतातील इंटरनेट कनेक्टीवीटीमध्ये पाच पट वाढ
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईशान्य भारतातील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखली जाणारी सात राज्य आजवर दुर्गमतेमुळे, पायाभूत सुविधांच्या आणि दळणवळण तसेच संपर्क यंत्रणांच्या अभावामुळे देशापासून काहीशी दुरावली होती. मात्र आता या राज्यांना दळणवळण आणि संपर्क यंत्रणांच्या उभारणीद्वारे उर्वरित देशाशी जोडण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ईशान्य भारतीय राज्यांमधील इंटरनेट कनेक्टिवीटीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
2014 मध्ये, ईशान्य भारतात फक्त 19,722 टॉवर्स किंवा बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (BTS) होते. आज ते ईशान्येत पाच पटीने वाढून 94,135 BTS झाले आहे. येथे 5G चे 3,437 BTS स्थापित केले आहेत, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
SL/KA/SL
22 April 2023