शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर जुन्याकडे वळले पाहिजे

 शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर जुन्याकडे वळले पाहिजे

नागपूर, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर परत आपण जुन्याकडे वळले पाहिजे आपलं जुनं ते सोनं होतं ते शेतामध्ये आणलं पाहिजे असे मत पद्मश्री पुरस्कार विजेत्या सीड मदर राहीबाई पोपेरे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा भाग म्हणून महिला विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळेला त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना उपस्थित होत्या.If we want to stop farmer suicides, we should go back to the old

प्रत्येकाचे ताट विषमुक्त असलं पाहिजे असेही त्या म्हणाल्या. आपण सर्व निसर्गाला विसरलो आहे आपण निसर्गाला धरून पीक घेत नाही आपण निसर्गाला धरून बी पेरत नाही आपण कोणतेही पिक कधीही घेतो उन्हाळी पीक पावसाळ्यात आणि पावसाळी पीक उन्हाळ्यात घेतो आपण बदललो म्हणून निसर्ग बदलला पुढच्या पिढीसाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार आपण करणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.

प्रत्येक गावात एकेक राईबाई तयार झाली पाहिजे प्रत्येक गावात जश्या पैशाच्या बँका भरपूर आहेत तसेच प्रत्येक गावात एकेक बी ची बँक असायला पाहिजे ज्या गावरान बी आहेत त्या प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचल्या पाहिजे प्रत्येकाच्या शेतापर्यंत गेल्या पाहिजे. प्रत्येकाच्या दारात घरात किचन गार्डन पाहिजे, परसबाग पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

प्रत्येक गोष्ठीमागे विज्ञान आहे, नविन पिढीला समजावून सांगण्यासाठी विज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी यावेळेला व्यक्त केले.

ML/KA/PGB
05 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *