यांच्या घरामधुन जाते महाराष्ट्र- तेलंगणा ची सीमा

 यांच्या घरामधुन जाते महाराष्ट्र- तेलंगणा ची सीमा

मुंबई,दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राला गुजरात,मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा तसेच दादरा-नगर हवेली हा संघराज्य प्रदेश यांच्या सीमा  लागून आहेत. या सीमावर्ती भागातील असलेल्या गावांतील नागरीकांना दोन्ही राज्यांशी जुळवून घ्यावे लागते. मात्र काही वेळा या सीमाप्रश्नामुळे काही अजब गोष्टी समोर येतात. एका व्यक्तीचे अर्धे घर तेलंगणामध्ये तर अर्धे घर महाराष्ट्रात असल्याची अनोखी बाब समोर आली आहे.

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती  या गावांमधील एका घरात अगदीच विचित्र प्रकार दिसून आला आहे. या घरातील स्वयंपाकघर हे महाराष्ट्रात आहे तर हॉल तेलंगणमध्ये. हे वाचायला चमत्कारीर वाटत असलं तरी खरोखर या घराच्या मध्यभागातून दोन्ही राज्यांची सीमा जाते. हे घर महाराष्ट्रातील जिवती आणि तेलंगणमधील महाराजगुंडा जिल्ह्यामध्ये हे घर विभागलं गेलं आहे.

या घरामध्ये पवार कुटुंबीय राहतात. घरात एकूण आठ खोल्या आहेत. त्यापैकी काही खोल्या एका राज्यात तर काही दुसऱ्या राज्यात आहेत. त्यामुळेच पवार कुटुंबियांना मालमत्ता करही दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने भरावा लागतो. दोन्ही राज्यांमधील खोल्यांच्या क्षेत्रफळानुसार वेगवगेळा संपत्ती कर पवार कुटुंबीय भरतं. मात्र तेलंगणकडून मिळणाऱ्या सुविधा या महाराष्ट्रापेक्षा अधिक आहेत, असे या कुटुंबाने नमुद केलं आहे.

मागील ५३ वर्षांपासून दोन्ही राज्यांमधील (आधी आंध्रप्रदेश आता तेलंगणा) जमिनीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानंतर हे घर दोन राज्यांच्या सीमांमध्ये वाटले गेले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवरील १४ गावांचा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे.  तसेच राज्याच्या अन्य सीमावर्ती भागांतील नागरीकही असुविधांंमुळे अन्य राज्यात जाण्याचा धोशा लावत आहे.

SL/KA/SL

16 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *