श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले

 श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इजिप्तमधील संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेमध्ये (सीओपी २७) जमलेल्या २०० देशांमध्ये रविवारी ऐतिहासिक करार झाला. यामध्ये श्रीमंत देशांना हवामान बदलासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. १४ दिवस झालेल्या जोरदार चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत श्रीमंत देशांना एक फंड तयार करावा लागणार असून, यामुळे गरीब देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भरपाई मिळेल. हा गरीब देशांचा मोठा विजय मानला जात आहे.Rich countries were blamed for climate change

अनेक श्रीमंत देश इतर मुद्द्यांवरून निधीच्या मुद्द्याला दाबवण्याचा प्रयत्न करत होते. भारत, ब्राझीलसह आशिया, आफ्रिका आणि अनेक देशांनी हा निधी मंजूर करण्याची जोरदार मागणी लावून धरली. गरीब आणि विकसनशील देशांनी मिळून श्रीमंत देशांवर दबाव आणला आहे.

ML/KA/PGB
23 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *