सरकारी कर्मचार्यांची ढीगसाळपणा आणि भ्रष्टाचार हे भारताच्या पिछडेपणाचे कारण: बाबुभाई भवानजीं
 
					
    मुंबई, दि २४: वरिष्ठ भाजपा नेते आणि माजी उप मेयर बाबुभाई भवlनजी नी मनाले की भारताच्या पिछडेपणामागे मुख्य कारण म्हणजे देशभक्तीची कमतरता, शाळांमध्ये प्रामाणिकपणा आणि कर्तव्य शिकविण्याचा अभाव, तसेच सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची ढीगसाळपणा, उदासीनता, भ्रष्टाचार आणि मनमानी आहे. ते म्हणाले की कर्मचारी स्वतःला राजा समजतात आणि जनतेला गुलाम, आणि त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होईपर्यंत देश आणि लोकांचा भला होऊ शकत नाही.
दादरमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलताना भवानजी म्हणाले की सरकारी कार्यालयांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी लाचारी पूर्वक अनेकदा चक्कर मारावी लागते. कर्मचारी आपल्या खुर्चीवर कमी आणि बाहेर व मोबाइल वर जास्त वेळ घालवतात. त्यांनी सुचवले की सरकारी कामांसाठी निश्चित वेळापत्रक ठरवावे आणि वेळेत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई वहावी.कार्य पद्धति स्थानिक भाषा, हिंदी आणि अंग्रेजी भाषात करावी*
भवानजी पूरे म्हणाले की कर्मचारी स्वतः जबाबदार झाले, तर आरटीआय आणि जबाबदारी कायद्याची गरज कमी होऊ शकते. प्रत्येक कार्यपत्रकावर कर्मचारी ओळख क्रमांक नोंदवणे आणि काम वेळेत पूर्ण न झाल्यास आर्थिक दंडाचा तरतूद करणे आवश्यक आहे.
त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुशासन आणि निरीक्षणावर लक्ष ठेवावे, वेळेवर काम पूर्ण होण्यास प्रोत्साहन द्यावे, पारदर्शक स्थानांतरण धोरण ठरवावे, तसेच समर्पित कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा असे मनाले.
भवानजी म्हणाले की सरकारी कर्मचार्यांची कार्यशैली ही नेहमी नकारात्मक प्रतिमा निर्माण करते. त्यांनी संगणकावर आधारित काम, बायोमेट्रिक उपस्थिती, प्रशिक्षण, ड्रेस कोड, आयडी कार्ड, तक्रार व सूचना पेट्या, रिपोर्ट कार्ड आणि ऑफिस वेळेत सुधारणा यासारखी पावले उचलण्याची आवश्यकता सांगितली.
शेवटी त्यांनी म्हटले की ढीगसाळ कर्मचार्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि मंत्री, जनप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचार्यांची उत्पन्नाची ऑडिट सार्वजनिक केली जावी.KK/ML/MS
 
                             
                                     
                                    